inner-banner

नगर नियोजन

Mohan G Sonar

श्री.मोहन जी. सोनार
प्रमुख,
नगर नियोजन

महाराष्ट्र शासनाने मुंबई महानगर प्रदेशातील विविध अधिसूचित क्षेत्रांकरिता या प्राधिकरणास विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे. या पैकी खालील विशेष नियोजन क्षेत्राचे कामकाज नगर नियोजन विभागा मार्फत हाताळण्यात येते-

    या विशेष नियोजन क्षेत्रांमध्ये या विभागा मार्फत खालील कामे हाताळण्यात येतात

    • विशेष नियोजन क्षेत्रांकरिता विकास आराखडा /नियोजन प्रस्ताव तयार करणे,
    • मंजूर विकास आराखडा /नियोजन प्रस्तावांमध्येफेरबदल करणे ,
    • विशेष नियोजन क्षेत्रात बांधकाम परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र, विकास आराखडा अभिप्राय इ.  देणे,
    • या क्षेत्रातील नियोजन व विकसनासंदर्भात विविध विभागांशी समन्वय साधणे,
    • या क्षेत्रातील नियोजन व विकसनासंदर्भात इतर संकीर्ण कार्य.

    Town Planning Marathi

    • ओशिवरे जिल्हा केंद्र :

    दक्षिण मुंबईतील कार्यालये, बाजारपेठ, व्यापार उद्योग यांचे सुनियोजित विकेंद्रीकरण करण्याकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १९७७ च्या "इष्टतम प्रादेशिक संरचनेच्या" धोरणातून प्रस्तावित नवी मुंबई, वांद्रे-कुर्ला संकुल इ. नवीन विकास केंद्रांपैकी ओशिवरे जिल्हा केंद्र देखील विकसित करण्याचे प्रस्तावित होते.पश्चिम उपनगरात जोगेश्वरी व गोरेगांव दरम्यान सुमारे 102 हेक्टरच्या जागेत जिल्हा केंद्र विकसित करण्याकरीता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक झाल्यावर प्राधिकरणाने तयार केलेल्या नियोजन प्रस्तावांस शासनाने दिनांक १६ जानेवारी,१९९२ रोजी मान्यता दिली.

    तत्पश्चात शासनाने त्यांच्या दिनांक 18 नोव्हेंबर, 2015 रोजीच्या अधिसूचनेअन्वये ओशिवरा जिल्हा केंद्रातील स्वामी विवेकानंद रस्त्याच्या पश्चिमेकडील भाग हा प्राधिकरणाच्या विशेष नियोजन क्षेत्राच्या हद्दीतून वगळून त्याचा समावेश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात केलाआहे. तसेच, शासनाने त्यांच्या दिनांक 18 नोव्हेंबर, 2015 रोजीच्या दुस-या अधिसूचनेअन्वये ओशिवरा जिल्हाकेंद्रातील वाणिज्यिक (एकात्मिक विकास) व वाणिज्यिक (रुपांतर) या वापर विभागासाठी अनुज्ञेयचटई क्षेत्र निर्देशांक 1.5 चा 4.00 तसेच निवासी, निवासी व दुकाने, सामाजिक व सांस्कृतिक सुविधा, सार्वजनिक व वापर सेवा, मिश्र भूमि उपयोगिता या वापरासाठीअनुज्ञेयचटई क्षेत्र निर्देशांक 3.00 एवढा केला आहे. मंजूर नियोजन प्रस्तावानुसार जमीन मालकांच्या सहभागाने प्रस्तावांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

    पाणी पुरवठा, पर्जन्य जलवहनवमलनिःसारण या सेवा बृहन्मुंबई महानगरपालिका पुरविते. सद्यस्थितीत प्राधिकरणाने या क्षेत्रातील रस्त्यांचे (पेयजलवाहिनी, पर्जन्य जलवाहिनी वमलनिःसारण वाहिनी सह) बांधकाम हाती घेतले आहे.

    • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्र:

    मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी असून याद्वारे भारत ४१ आंतरराष्ट्रीयव ४० राष्ट्रीयगन्तव्यांशी जोडले गेले आहे. या क्षेत्रामधील जमिनी या भारतीय विमानपत्तन प्राधिकरणयांच्या मालकीच्या असून त्या भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने मुंबई इंटरनॅशनलए अरपोर्टप्रा.लि. यांना एप्रिल, 2006 मध्ये झालेल्या भाडेपट्टा करारानुसार 30 वर्षांकरिता हस्तांतरीत केल्या आहेत. सदरकरार हा पुढील 30 वर्षांकरीता वाढविता येऊ शकतो.भारतीय विमानतळ प्राधिकरण व मुंबई आंतरराष्ट्रीयए अरपोर्टप्रा.लि. यांच्यामध्ये एप्रिल, 2006 मध्ये झालेल्या ऑपरेशन, मेंटेनन्स व डेव्हलपमेंट करारानुसार, मुंबई आंतरराष्ट्रीयए अरपोर्टप्रा.लि. यांनी सदर क्षेत्रामधील नियोजन, विकसन, बांधकाम व देखभाल करावयाची आहे.

    शासनाने त्यांच्या दिनांक 14 मे, 2009 रोजीच्या अधिसूचनेद्वारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सुमारे 802.03 हे. क्षेत्रफळाच्या मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्राकरीता विशेष नियोजन प्रधिकरण म्हणून नेमणूक केली आहे. शासनाने त्यांच्या दिनांक 17 मे, 2013 रोजीच्या अधिसूचनेद्वारे मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्राचा अंतरिमविकास आराखडा (झोपडयांखालील क्षेत्रवगळता - 125.03 हे.) मंजूर केला आहे.

    मुंबई आंतरराष्ट्रीयए अरपोर्टप्रा.लि. हे भाडेपट्टेदार या नात्याने मंजूर अंतरीम विकास आराखडयानुसार मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्रामधील पायाभूत सुविधा, वैमानिक सुविधा व इतर सुविधांचा विकास करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्रामधील शहरस्तरावरील पायाभूत सुविधा जसे पेय जलवाहिनी, नाले, विदयुतसेवा, सांडपाणी इत्यादी सोईंचे विकसन/देखरेख मुंबई महानगरपालिकेने करावयाचे आहे. मुंबई महानगर प्रदेशविकास प्राधिकरण हे सदर अधिसूचित क्षेत्राकरिता विशेष नियोजन प्राधिकरण या नात्याने सदर क्षेत्रामधील कार्यरत प्रकल्पांना मंजूरी व इतर बांधकाम परवानग्या देत असते. या व्यतिरिक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे विमानतळाच्या सभोवतालच्या क्षेत्रात विविध मेट्रो मार्गिकांचे विकसन करीत आहे ज्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांची देखील सोय होईल.

    • वडाळा अधिसूचित क्षेत्र:

    महाराष्ट्र शासनाने दक्षिण मुंबईतील वाहतूक आणि प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने तेथील वाहतूक कंपन्या आणि सार्वजनिक वाहतूक संस्थायांची कार्यालये पुर्नस्थापित करण्यासाठी 1984 मध्ये वडाळा येथील सुमारे 126.64 हेक्टर जमीन भार वाहकतळ विकसित करण्याकरीता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास ९९ वर्षांकरिता हस्तांतरीत केली.प्राधिकरणातर्फे सदर जागेकरीता चार टप्पे समाविष्ट असलेला अभिन्यास तयार करण्यात आला. त्यामधील भार वाहकतळ टप्पा-1 चासविस्तर अभिन्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे दिनांक 06/09/1986 रोजी मंजूर करण्यात आला.

    2005 मध्ये वडाळा ट्रक टर्मिनल करिता प्राधिकरणाची "विशेष नियोजन प्राधिकरण" म्हणून नेमणूक झाल्यानंतर प्राधिकरणाने तयार केलेल्या नियोजन प्रस्ताव आणि विकास नियंत्रण व नियमावलीस शासनाने 2010 मध्ये मंजूरी दिली. सदर मंजूर विकास नियंत्रण व नियमावलीनुसार वडाळा अधिसूचित क्षेत्राकरिता ग्लोबल 4.00 इतकाच टई क्षेत्रनिर्देशांक अनुज्ञेय आहे.

    मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखालील शक्तीप्रदत्त समितीने( Empowered Committee) वडाळा भार वाहकतळ हे मानखुर्द किंवा मुंबई शहराच्या बाहेर स्थलांतरित करण्याचा व वडाळा येथील जमिनीचे विकसन हे अस्तित्वात असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर वाणिज्यिक केंद्र म्हणून करण्याचा निर्णय घेतला.

    त्यामुळे प्राधिकरणाने अस्तित्वातील मोनोरेल व डेपो, प्रस्तावित मेट्रो मार्ग ४ व डेपो, प्रस्तावित आंतरराज्यीय बस स्थानक तसेच जवळील अणिक आगार वपूर्वमुक्त मार्ग यांचा विचार करून परिवहन उन्मुख विकसनाकरिता नगर रचना मार्गदर्शक तत्वांसह बृहत आराखडा तयार केला व त्याप्रमाणे प्रस्तावित सुधारीत नियोजन प्रस्तावास व विकास नियंत्रण नियमावलीस शासनाने 2019 मध्ये मंजूरी दिली आहे.

    सदर नियोजन प्रस्तावाची अंमलबजावणी या प्राधिकरणामार्फत करण्यात येईल. सदर क्षेत्रातील भूखंड प्राधिकरणाच्या ‘जमिनीची विल्हेवाट नियमावली -1977' अन्वयेवितरीत करता येतील व त्यामधून प्राप्त होणारे उत्पन्न मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सोयी-सुविधा उभारण्यास वापरण्यात येईल.

    • इंदूमिल मुंबई येथे भारतरत्न डॉ बाबासाहेबआंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक

    इंदूमिल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरयांच्या भव्य स्मारकाच्या विकसनासाठी शासनाने 2013 मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली. सदर भव्य स्मारकाच्या विकसना संदर्भात शासनाने विहीत केलेल्या जबाबदा-या प्राधिकरणपार पाडीत आहे. सदर स्मारक लोकांकरीता असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां प्रती आदरांजली असेल.

    पाद पीठावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कांस्य धातूनेआच्छादित सुमारे 450 फुट उंची चा पुतळा (350 फूट उंच पुतळा + 100 फूट पाद पीठ) या स्मारकाचे मुख्य वैशिष्ट्य असेल.पुतळ याच्या पादपीठामध्ये बौध्द वास्तुरचना शैलीतील घुमट असून पुतळयाच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी चक्राकार मार्गिका आहे. सुमारे 1000 आसन क्षमता असलेले प्रेक्षागृह, प्रदर्शनाकरीता दालने, संशोधन केंद्र, ग्रंथालय, परिषदा भरवण्यासाठी सभागृह, ध्यान धारणा केंद्र, परिक्रमापथ, स्मरणिका विक्री केंद्र, प्रतिक्षालय, उपाहारगृह, प्रशासकीय कार्यालय, स्वच्छतागृह, बगीचे, वाहनतळ इत्यादींचा स्मारकामध्ये समावेशआहे.

    सदर स्मारक एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.